१८३९: युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.
१९१४: पहिले महायुद्ध – जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९४२: मो. ग. रांगणेकर यांच्या कुलवधू नाटकाचा पहिला प्रयोग.
१९४२: दुसरे महायुद्ध – स्टालिन ग्राडची लढाई सुरू.
१९६६: लुनार ऑर्बिटर-१ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.
१९९०: आर्मेनिया सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
१९९१: वर्ल्ड वाईड वेब सार्वजनिक उपयोगासाठी सुरु झाले.
१९९७: हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.
२००५: कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
२०११: लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफीची सत्ता संपुष्टात.
२०१२: राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार.

६३४: अबू बकर अरब खलिफा .
१३६३: डहाण राजवटीचे संस्थापक चेन ओंलियांग .
१८०६: फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स कुलोम यांचे निधन. (जन्म: १४ जून १७३६)
१८९२: ब्राझीलचे पहिले अध्यक्ष डियोडोरो डा फोन्सेका . (जन्म: ५ ऑगस्ट १८२७)
१९७१: रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर –मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री (सांगत्ये ऐका, लोकशाहीर रामजोशी, विजयाची लग्ने, संतसखू, रामशास्त्री,
आजाद, नवजीवन, धन्यवाद, मेरे लाल). सांगत्ये ऐका नावाचे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. (जन्म: २४ जानेवारी १९२४)
१९७४: डॉ. शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक. पंढरपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे (१९५५) ते अध्यक्ष होते. (जन्म: २८ फेब्रुवारी १८९७)
१९७५: पं. विनायकराव पटवर्धन –नामवंत शास्त्रीय गायक, गुरू, संगीतप्रसारक व अभिनेते. १९३२ मध्ये त्यांनी पुण्यात गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. (जन्म: २२ जुलै १८९८)
१९९४: इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू आरती साहा . (जन्म: २४ सप्टेंबर १९४०)
१९९७: ग्रेनाडा चे पहिले पंतप्रधान एरिक गेयरी . (जन्म: १८ फेब्रुवारी १९२२)
२०१३: आर.जे. कॉमन रेल्वेमार्ग गटाचे संस्थापक रिचर्ड जे. कॉर्मन . (जन्म: २२ जुलै १९५५)
२०१८: कुलदीप नय्यर,प्रसिध्द लेखक,पत्रकार,मानवाधिकार कार्यकर्ते आणि राजनेता (जन्मतारीख: १४ ऑगस्ट, १९२३)