भारतीय प्रजासत्ताक दिन.

घटना

१५६५: विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.

१६६२: लोहगड-विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांच्या चढाया.

१८३७: मिचिगन हे अमेरिकेचे २६ वे राज्य बनले.

१८७६: मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली.

१९२४: रशियातील सेंट पीट्सबर्गचे लेनिनग्राड असे नामकरण करण्यात आले.

१९३३: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सूरुवात केली.

१९४२: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांचे युरोपातील नॉर्दन आयर्लंड येथे आगमन.

१९४९: भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.

१९५०: भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.

१९५०: एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९६५: भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले.

१९७८: महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू.

१९९८: कॅप्टन लक्ष्मी व उषा मेहता यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान.

२००१: गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे २०,००० लोक ठार झाले.

जन्म

१८९१: बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९३७)

१९२१: सोनी कार्पोरेशनचे संस्थापक अकिओ मोरिटा यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १९९९)

१९२५: अभिनेता, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर पॉल न्यूमन यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर २००८)

१९५७: क्रिकेटपटू शिवलाल यादव यांचा जन्म.

मृत्यू

१७३०: कवी श्रीधर यांनी समाधि घेतली.

१८२३: देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर एडवर्ड जेन्‍नर यांचे निधन. (जन्म: १७ मे १७४९)

१९५४: देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १८८७)

१९६८: लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १८८०)

२०१५: व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९२१)