राजमाता जिजाऊ मुर्ती चे छायाचित्र, सिंदखेड राजा

बुलढाणा जिल्हा पर्यटन

राजमाता जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा

राजमाता जिजाऊ जन्मस्थळ च्या प्रवेशाचे छायाचित्र, सिंदखेड राजाराजमाता जिजाऊ मुर्ती चे छायाचित्र, सिंदखेड राजाराजमाता जिजाऊ जन्मस्थळ, सिंदखेड राजा यांची प्रतिमाराजमाता जिजाऊ जन्मस्थळ च्या प्रवेशाचे छायाचित्र, सिंदखेड राजाराजमाता जिजाऊ मुर्ती चे छायाचित्र, सिंदखेड राजा

जिजामाता, (राजमाता जिजाऊ) हयांचा जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला.

राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या.

आज हे स्थळ केवळ ऐतिहासिक स्थळ नाही तर एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखल्या जाते.

जिजाऊ माँसाहेबांचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये १२ जानेवारी १५९८ साली झाला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर हायवेला लागुनच आहे. याच वास्तूसमोर नगर पालिका निर्मित एक बगिचा देखील आहे. येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे. ही भव्य वस्तू भारतातील संपूर्ण हिंदुराज्यांच्या समाधीपेक्षा मोठी वास्तू आहे. ज्या ठिकाणी जिजाऊंनी रंग खेळला तो महाल म्हणजे रंगमहाल. याच महालात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची बोलणी करण्यात आली होती.

 नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर

नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे, या मंदिरामध्ये संपूर्ण पाषाणातून साकारलेले हरीहाराचे सुंदर शिल्प आहे, तर राजे लखुजीराव जाधवांनी मंदिराचे पुर्नजीवन केल्याचा शिलालेख कोरलेला आहे. या मंदिरासमोरच चौकोनी आकारात तळापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असणारी एक भव्य बारव आहे. तर ८व्या ते १० व्या शतकातील अतिप्राचीन असे हेमाडपंथी रामेश्वर मंदिर आहे.

राजेराव जगदेवराव जाधवांच्या कार्यकाळात भव्य किल्यांच्या निर्मितीची सुरवात झाली होती त्याचचं एक सुंदर उदाहरण म्हणजे काळाकोठ. अतिभव्य आणि मजबूत अशा या काळाकोठच्या भिंती २० फुट रुंद आणि तेवढ्याच उंच आहेत. यासोबतच साकरवाडा नावाचा ४० फुट उंच भिंतीचा परकोट येथे बघायला मिळतो, त्या परकोटावर निगराणीसाठी अंतर्गत रस्ता, आतमध्ये विहीर, भुयारी तळघरे, भुयारी मार्ग आहेत. तर या वस्तूचे प्रवेशद्वार देखील अतिसुंदर आहे.

मोतीतलाव म्हणजे सिंचनासाठी पाणी सोडण्याची अति सुव्यवस्थीत आणि त्या काळातील जल अभियांत्रीकीचा अतिउत्कृष्ट नमुना. या तलावाच्या समोरील भाग एका किल्ल्याप्रमाणे बांधण्यात आला असून, विलोभनीय असा परिसर याला लाभला आहे. मोतीतलावाबरोबरच चांदणी तलाव हे देखील एक प्रेक्षणीय स्थळ आहे. तलावाच्या मधोमध तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे. या परिसरात अतिशय रेखीव पद्धतीने बांधण्यात आलेली पुतळाबारव आहे. ही म्हणजे असंख्य मूर्ती व शिल्पांचा एकत्र वापर करून बनविलेली देखणी शिल्पकृती. तसेच येथे एक सजनाबाई विहीर आहे, त्या काळी या विहिरीतून गावामध्ये पाणी पुरवठा भुमिगत बंधिस्त नाल्यांच्या द्वारे केल्या जात होत्या, या विहरीत आतपर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची सुविधा देखील आहे.

लोणार सरोवर

लोणार सरोवर, लोणार चे छायाचित्र

लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे. याची निर्मिती एका उल्केमुळे झाली. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. हे खाऱ्या पाण्याचे आणि अल्कधर्मी सरोवर आहे. लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत.

सरोवराची निर्मिती ५२,००० ± ६००० वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते. पण २०१० साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात सरोवराचे वय ५,७०,००० ± ४७,००० वर्ष इतके वर्तवण्यात आले आहे.

अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजीकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे.

कसे पोहोचाल?:

विमानाने

औरंगाबाद येथिल विमानतळ 140 किमी अंतरावर आहे.

रेल्वेने

सर्वात जवळचे रेल्वे स्थानक परतूर आणि जालना आहेत.

रस्त्याने

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्टेशनमधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.

निवास

शासकीय विश्राम गृह, लोणार आणि एमटीडीसी रिसॉर्ट, लोणार हे लोणार सरोवर पासून अनुक्रमे २.९ कि.मी आणि २.४ किमी अंतरावर आहेत.

गजानन महाराज मंदिर

संत गजानन महाराज, शेगाव येथील छायाचित्र

संत गजानन महाराज मंदिर, शेगाव चे छायाचित्र
“श्री” गजानन महाराजांचे समाधी मंदिर मध्यभागी असून परिसराच्या ‘ उत्तर व पश्चिम ‘ दिशेस दोन भव्य प्रवेशव्दारे आहेत.
अवघ्या ३२ वर्षांच्या अवतारकार्याव्दारे आध्यात्मिक जगतात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या संत सत्पुरुष “श्री” नी १९०८ साली, त्यांच्या अवतार समाप्तीचे संकेत देताना ” या जागी राहील रे ” असे सांगत ज्या ठिकाणी निर्देश केला त्याच जागेवर आज “श्री” चे भव्य समाधी मंदिर उभारण्यात आले आहे. “श्री” च्या समक्ष व संमतीने निर्माण झालेल्या या समाधी मंदिराच्या भुयारात जिथे श्री. हरी पाटलांनी शिला ठेवली होती तिथे “श्री” ची संजीवन काया “समाधिस्थ” आहे.

पंढरपूर हे संतांचे माहेर घर, तर शेगांव हे भक्तांचे !
संतांजवळ सर्व जातीपंथाचे भक्त अमन शांती मिळावी म्हणून जातात. गुरू हे तत्व आहे, पवित्र जीवन ते संत. श्रध्दा व भावाची दृढता ते भक्त. “श्रीं” चे समाधी मंदिर अत्यंत आकर्षक अशा संगमरवरी बांधणीतून घडविलेले असून थेट दर्शन तसेच श्री मुखदर्शनाव्दारे भक्तजनांना आपल्या आराध्य दैवताचे अलौकिक रूप पाहता येते. गाभाऱ्यासमोरील प्रशस्त, मोकळ्या जागेतून श्री गजानन महाराजांचे ‘डोळा भरून‘ दर्शन घेता येते. समाधी मंदिराच्या बाहेरील बाजूस नानाविध देवीदेवतांची अप्रतिम शिल्पे कोरण्यात आली आहेत.
आनंद सागर शेगाव

आनंदसागर,शेगाव मधील ध्यान मंदिराचे छायाचित्र

शेगांवात सर्वत्र असलेले पाण्याचे दुर्भिक्ष पाहतां. जर परिसरातील तलाव पाण्याने भरुन राहिला तरच गावातील पाण्याची गरज भागू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली असतां, संस्थानने मन नदितून पाणी आणून या तलावात सोडण्याची योजना हाती घेतली. दोन कोटीहून जास्त या योजनेत दर महा होणारा पन्नास लाखांपर्यंतचा खर्च संस्थानच्या आर्थिक कार्यक्रमांमध्ये न बसणारा असा.

तेव्हा या तलावास मध्यवर्ती ठेवून त्याच्या आजूबाजूचा परिसर विकसीत केला असतां व तेथे अध्यात्मिक केंद्र तसेच मनोहारी उद्यान निर्माण केल्यास येणाऱ्या महसुलातून पाण्याची समस्या कायमस्वरुपी सोडवता येईल या हेतूने आनंदसागर प्रकल्पाची निर्मीती झाली.

नजरेतही साठविता न येणारे, उत्कृष्ट कलाकृतींच्या अजोड कारागीरीने मन थक्क करणारे असे आनंसागरचे भव्य प्रवेशद्वार. विविध रंगाची मनमोहक पखरण करणारी रंगीबेरंगी फुले पहात, सभोवताली चाफ्यांच्या फुलांचा मंद दरवळ घेत आपण या प्रवेशद्वारातून आत शिरतो ते पावलांपावलांवर आश्चर्याने थक्क होण्यासाठीच.

संत मंडप
प्रवेशव्दारातून खाली येताच समोर आनंदसागर परिसराचे विस्तीर्ण क्षेत्र दिसते. आजुबाजूस गच्च व गर्द झाडी, रंगीबेरंगी फुलांचे ताटवे, कारंज्यातून उसळणारे व लयबध्द स्वरात झुळझुळणारे पाणी सोबत घेऊनच आपण विस्तीर्ण अशा संतमंडपात प्रवेश करतो. या अर्धवर्तुळाकार, भव्य अशा संतमंडपात १८ राज्यातील १८ संतांच्या प्रतिमा स्थापन केल्या आहेत. मध्यभागी विस्तीर्ण परिसरात कारंज्यातून उसळणाऱ्याा पाण्यांचे तुषार अंगावर झेलीत प्रसन्न भावमुद्रेत बसलेली श्री गजानन महाराजांची भव्य मुर्ती मन मोहून नेते . आद्य शंकराचार्य, मिराबाई तसेच संत कबीर, ताजुद्दीनबाबांपर्यंतचे विविध राज्यातील संत व त्यांची उद्बोधक वचने येथे पहावयास मिळतात.

आनंदसागरचा भव्य परिसर पाहणाऱ्यांसाठी संस्थानने ठिकठिकाणी थंड पाण्याची सोय केली आहे तसेच उन्हापासून संरक्षण करणाऱ्याा छत्र्यांची विनामुल्य विशेष व्यवस्था केली आहे. आनंदसागरचा भव्य परिसर सहजतेने पहाण्याचा आनंद विकलांगांनाही लुटता यावा यासाठी संस्थानने खास व्हील-चेअर्सची सोय करून दिली आहे. त्याचबरोबर या परिसरात रममाण होणाऱ्याा लहानग्या बाळांसाठी बाबागाड्यांची सोय उपलब्ध करून देताना संस्थान, प्रत्येक व्यक्तीचा अगदी सुक्ष्मपणे व जिव्हाळ्याने कसा विचार करते याची झलक आपणांस पहावयास मिळते, शिवाय छोट्या रेल्वेगाडीत बसून पूर्ण परिसराचे अवलोकन करता येते.

वास्तविक पाहतां वैदर्भीय भूमीवर निसर्गाचे तसे दुर्लक्षच झाले आहे. पर्जन्यवृष्टीचा अभाव व वातावरणातील दाह यामुळे एकंदरच हा परिसर रखरखीत भासणारा. मात्र स्वकर्तृत्वाने या निसर्गासही आपलेसे करून मानवी हातांनी या दगडांमधून घडवलेली शिल्पे व उजाड मातीमधून फुलविलेल्या बागा म्हणजेच जणू जिवाशिवाचे अद्भुत मिलनचं. याच भूमीतील तलावाच्या काठावर संस्थानने ‘आनंदसागर‘ नावाचं एक अशक्यप्राय असं स्वप्न पाहिलं, स्वत:च्या कर्तृत्वाचा सार्थ अभिमान बाळगत ते साकारलं आणि पाहतां पाहतां सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या कृपाशिर्वादाने पृथ्वीवर जणू स्वर्गच उतरला.

विश्रांती स्थळ
आनंदसागरच्या नयनरम्य परिसराचा आस्वाद घेतांना अधून मधून विश्रांतीची आवश्यकता भासते अशा वेळेस पाय आपसुकच विश्रांतीस्थळाकडे वळतात. आनंदसागरमध्ये जागोजागी अप्रतिम कलाकुसर असलेली, नक्षीदार खांबांनी सजलेली विश्रांतीस्थळे पहावयास मिळतात. व्दारकाबेट तसेच श्री विवेकानंद ध्यानकेंद्र येथे जाण्याच्या मार्गावर अशाच प्रकारची विश्रांतीस्थळे उभारली आहेत. येथे विश्रांतीसाठी लाकडी बाकडे ठेवली असून आजूबाजूचा परिसर गर्द लता, वेलींनी आच्छादलेला असून सभोवताली दिसणाऱ्याा रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यांकडे पहाताक्षणीच शरीराला आलेला थकवा नाहीसा होतो व मरगळलेल्या पावलांना नवी उभारी मिळून पाय आपसूकच लगबगीने ध्यानकेंद्राकडे आकर्षिले जातात.

आनंदसागर या मनोहारी उद्यानाचा पाया अध्यात्मिक वारसा व उच्च वैभवशाली हिंदु संस्कृतीवर आधारीत आहे हे आपणांस पावलोपावली जाणवते. राज्यातील तसेच जगभरातील विविध संप्रदायातील संत, महंतांचे पुतळे जागो-जागी उभारण्यात आले आहेत. संस्कृति व संस्कार यांचे महत्व अधोरेखित करणाऱ्याा वचनांचे फलक आपले ज्ञान अधिक समृध्द करतात. येथील उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे येथे उभारलेली मंदिरे. श्रीगणेश मंदिर, श्री शिव मंदिर, नवग्रह मंदिर आदि महान देवतांची आकर्षक अशी ही मंदिरे म्हणजे शिल्पकलेचा एक अजोड नमूनांच ठरावा. अप्रतिम कलाकुसर, नक्षिदार खांब व आकर्षक कोरीव कमानी असलेली ही शिल्पे पाहून त्यांना दगडातून साकार करणाऱ्याा त्या अनामिक शिल्पकाराच्या कलेला दाद देण्यासाठी हात नकळतचं जोडले जातात.

झुलता पुल
निसर्ग व मानव एकत्र आल्यावर काय घडू शकते यांचे प्रत्यंतर पाहावयाचे असेल तर द्वारकाबेटाकडे आपणांस नेणारा झुलता पुल पाहावांच लागेल. तलावावर उभारलेल्या लांब लचक पुलावरुन जात असता रंगीबेरंगी फुलांचे ताटवे आपल्या मंद सुगंधाची पखरण करत आपली साथसोबत करतात आणि आपण पोहचतो या झुलत्या पुलापासी. डौलदार पिसारे फुलवणारा मत्त मयुर व चंदेरी झळाळी ल्यायलेल्या मासोळ्या यांची प्रतिके असलेला हा झुलता पुल आपल्याला थक्क करुन सोडणारा. शेगांव सारख्या आडवळणी गांवी मोठमोठ्या शहरातूनही अभावानेच आढळणारी ही कारागिरी नक्कीच कौतुकास्पद व उत्स्फूर्तपणे दाद देण्याजोगी

स्वामी विवेकानंद ध्यानकेंद्र
अम्रुर्त तत्वाला चिरंजिवित्व बहाल करुन निर्माण होऊ घातलेल्या ‘आनंदसागर ‘ या पृथ्वीवरील नंदनवनाच्या अद्वितीय कलाकृतीचा परमोच्च बिंदू म्हणजे स्वामी विवेकानंद ध्यानकेंद्र. ‘ध्यान साधनेतून परमार्थ‘ ही नवी तत्वप्रणाली उभ्या जगाला देतांना स्वामीजींनी प्रत्येक भाविकाला मोक्षाच्या चरणसीमेपर्यंत सहजतेने आणलं. आनंदसागरचे स्वर्गीय वैभव अष्टदिशांमधुन पहातांना थक्क झालेलं आपल मन येथील ध्यानकेंद्रातील शांत व मंगलमय वातवरणात पवित्र होतं यात शंकाच नाही.

आपल्या मनातील शातंता व स्थैर्य आणि स्वामीजींच्या चेहऱ्या वरील शांत, नितळ व स्निग्ध भाव याचं अद्वैत साधलं जातं आणि आनंदसागरच्या रम्य वातावरणात डूंबून गेलेल मन पृथ्वीवर सहजरीत्या मिळणाऱ्या या स्वर्गसुखांतच रममाण होतं.

मत्स्यालय
संतमंडपातून उजव्या बाजूस थोडे अंतर चालून गेल्यावर एका विस्तीर्ण परिसरात उभे असलेले मत्स्यालय दिसते. भारतात आढळणाऱ्यां शोभीवंत माशांच्या विविध प्रजाती तसेच मोठे मासे, कासव आदि या मत्स्यालयात पहावयास मिळतात. अंधाऱ्या गुहेचा आभास करुन देणाऱ्यां या मत्स्यालयातील बोगद्यांमध्ये असलेल्या छोटया-मोठ्या पोकळ्यांतून विद्युत झोतात दिसणारे हे रंगीबेरंगी लहान-मोठ्या आकाराचे मासे पाहून बच्चे कंपनीस, आपण एखाद्या वेगळ्याच जल-विश्वात आलो असल्याचा भास न झाला तर नवलचं.

बालोद्यान
संतमंडपाच्या डाव्या बाजूस बालोद्यान असून येथेही झोपाळे, घसरगुंड्या, रोलरकोस्टर, यासारखे नानाविध अत्याधुनिक खेळांचे प्रकार लहान मुलांना उपलब्ध करुन दिले गेले आहेत. विस्तीर्ण अशा या परिसरात एका वेळेस हजारो मुले खेळु शकतील इतके खेळांचे प्रकार व सुविधा उपलब्ध असून हा परिसर झाडा-झुडपांनी व लता-वेलींनी आच्छादलेला आहे. येथे लहानच काय तर मोठ्यानांही क्षणभर आपले वय विसरुन खेळण्यातला आनंद लुटावासा वाटतो व क्षणभर ‘बालपण‘ मुक्तपणे उपभोगावसं वाटतं.

आनंदसागरच्या रमणीय परिसरामध्ये लक्ष वेधून घेतात ती जागोजागी आढळणारी अप्रतिम शिल्पे. विविध देवी-देवता, संत-महंत, महापराक्रमी योध्दे इतकेच काय तर प्राणीमात्रांचीही जिवंत भासणारी शिल्पे, आपणांस थक्क करुन सोडतात. इथल्या मातीत जन्मलेल्या या कलाकारांच्या या कौशल्याला, देवदत्त प्रतिभेला संस्थानने आत्मविश्वासाचे पाठबळ दिले व प्रोत्साहित केले आणि पाहतां पाहतां या विश्वकम्र्याच्या वंशजांनी पृथ्वीवर आनंदसागरच्या रुपाने ‘मयसृष्टी‘ निर्माण केली.

कोरीव कलाकुसरीने नटलेल्या कमानी, शैलीदार पध्दतीचे आखीव-रेखीव खांब यामधून आपल्यातील दैवी प्रतिभेचं जन्मजात लेणं चोहोअंगांनी उधळणाऱ्या या शिल्पकारांनी ‘आनंदसागर‘ च्या रुपाने जे शिल्प प्रत्यक्षात साकार केलं त्याचं वर्णन फक्त एकाच वाक्यात करता येईल, ते म्हणजे ‘न भूतो न भविष्यती‘.

अ‍ॅम्पी थिएटर
देशातील काही मोजक्याच ठिकाणी आढळणाऱ्या खुल्या रंगमंचापैकी एक रंगमंच आनंदसागरच्या परिसरामध्ये उभा राहिला आहे. अद्ययावत ध्वनी व प्रकाशयोजना तसेच विस्तिर्ण रंगमंच लाभलेला हा अ‍ॅम्पी थिएटरचा परिसर लक्षात राहतो तो त्याच्या भव्यतेमुळे. येथे धार्मिक, अध्यात्मिक स्वरुपाचे कार्यक्रम तसेच किर्तन- प्रवचनादी संस्कृतीदर्शक सादरीकरणाचे प्रयोग व्हावेत आणि त्याव्दारे भाविकांना आपल्या उच्च व सामथ्र्यशाली हिंदु संस्कृतीचे आकलन व्हावे हा यामागचा संस्थानचा हेतू आहे.

या अ‍ॅम्पी थिएटरमध्ये बैठक व्यवस्था करतांनाही सिमेंटची बाके किंवा प्लस्टिकच्या खुच्र्यांमुळे येणारा रुक्षपणा टाळून चक्क ही उतरती बैठक व्यवस्था हिरवळीने आच्छादलेली आहे. या बैठकींच्या उंच कमानीवर संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद आदि संताचे तसेच श्री छत्रपती शिवराय व राणा प्रताप यांसारख्या अनेक महापराक्रमी वीरांचे पुतळे उभारले आहेत.

भोजनव्यवस्था,कॉफीहाऊस
या भव्य परिसरामध्ये येथे येणाऱ्या सर्वांच्या क्षुधाशांतीसाठी अनेक उपहारगृहे, कॉफीशॉप्स यांची व्यवस्था केलेली आहे. या उपहारगृहामधून नाश्ता, चहा, कॉफी, सरबत तर मिळतेच शिवाय विविध प्रांतातील वैशिष्ट्य जपणाऱ्या खाद्यपदार्थाची चवही चाखावयास मिळते. आनंदसागरच्या प्रवेशव्दारापाशी भोजनकक्षाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे तसेच आनंदसागर परिसरामध्ये असलेल्या भव्य व विस्तृत भोजनकक्षामधून आपण भोजनाचा आनंद घेऊ शकतो. आनंदसागरच्या प्रवेशव्दारापाशी भव्य पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात आली असून एकाच वेळेस शेकडो वाहने येथे विनासायास उभी राहू शकतात.

श्रीराम मंदिर
“श्रीं” चे दर्शन घेऊन भुयारातून भक्त श्रीराम मंदिरात प्रवेश करतात, अशी रचना करण्यामागे एक विशिष्ट हेतू आहे; संतांकडे गेल्यावर संत भक्तांना देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवितात. म्हणून महाराजांचे दर्शन घेऊन भुयारातून बाहेर पडल्यावर श्री गजानन महाराज संजीवन समाधी स्थानाच्या वरील बाजूस सुवर्णमयी प्रभावळीतून साकारलेल्या श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्र, सीतामाई व लक्ष्मण यांच्या संगमरवरी आकर्षक व विलोभनीय मूर्तीचे दर्शन होते. या मंदिराचे प्रवेशव्दार तसेच गाभाऱ्यातील काही भाग सुवर्णपत्र्याने मढविलेला आहे. येथेच श्रींच्या नित्य वापरातील पादुका तसेच चांदीचे मुखवटेही आहेत. हे चांदीचे मुखवटे श्रींच्या पालखी सोहळयामध्ये भक्तदर्शनार्थ ठेवले जातात.

सभामंडप
श्रींच्या समाधीचे दर्शन घेऊन, पायऱ्या चढून वर येताच पाषाणातून कोरलेल्या कलाकुसरयुक्त नक्षीदार कमानी आणि डौलदार खांबांवर साकारलेल्या भव्य सभामंडपात श्री गजानन विजय ग्रंथातातील श्रींचे विविध लीला प्रसंग चित्ररूपाने साकारलेले दिसतात.पूर्वीच्या दगडाच्या खांबावर रंग चढवल्याने त्या अधिक आकर्षक दिसतात. याच सभामंडपात श्रीराम मंदिर तसेच दासमारुतीचे छोटे परंतु आकर्षक मंदिर दृष्टीस पडते.
व्यंकटगिरी बालाजी चे भव्य मंदिर

बुलढाणा येथील राजूरघाटाच्या निसर्गरम्य परिसरात व्यंकटगिरी बालाजी चे भव्य मंदिर आहे.

तिरूमला येथील बालाजीची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली असून परिसरात डोंगर आहेत.

व्यंकटगिरी राजूरघाट परिसरातील बालाजी मंदिराच्या प्रांगणात हनुमानजीची २१ फूट उंच मूर्ती आहे.

बुलढाणा येथील राजूरघाटाच्या निसर्गरम्य परिसरात धम्म गिरी, बुलढाणा आहे.

शारंगधर बालाजी मंदिर
मेहकर तालुका हा अजिंठा पर्वतरांगामध्ये स्थित आहे. शहराजवळील पैनगंगा नदी वाहते. मेहकर येथे भगवान शारंगधर बालाजीचे मंदिर 120 वर्षांहून जुने आहे. बालाजींच्या शिल्प सोबत सापडलेल्या तांबे, पितळ, सोने या धातूंत कोरलेले शिलालेख व जडजवाहीर आता ब्रिटीश संग्रहालय, इंग्लंडमध्ये आहेत. हे आशियातील भगवान बालाजीचे सर्वात मोठे शिल्प आहे.ही मूर्ती एकाच काळ्या दगडात बनविली आहे. भगवान बालाजीसाठी दरवर्षी उत्सव होत असतो.

रेणुका देवी, चिखली
श्री क्षेत्र बुधनेश्वर, मढ
हनुमान मूर्ती, नांदुरा
बालाजी मंदिर, देऊळगाव राजा ची प्रतीमा
बालाजी, देऊळगाव राजा ची प्रतिमा
देवळगांव हे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील एक शहर आहे. देवळगांवमध्ये जुने बालाजी मंदिर आहे व ते महाराष्ट्राचे “तिरुपति” म्हणूनही ओळखली जाते. १६६५ मध्ये राजे जगदेवराव जाधव यांनी हे मंदिर बांधले आहे.

दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात ‘बालाजी महाराज यात्रा’ नावाचा एक स्थानिक उत्सव असतो. ‘लाथा मंडपोत्सव’ हे ह्या यात्रेचे प्रमुख आकर्षण आहे. भगवान बालाजींच्या मंदिरासमोर ४२ ‘मंडप २१ लाकडाचे खांबाच्या सहाय्याने उभे केले आहे. हे लाकूड खांब साग लाकडापासून बनविले आहेत. प्रत्येक स्तंभाची उंची 30 फुट आहे आणि व्यास 1.0 फूट आहे.

सैलानी बाबा दर्गा सैलानी

रेणुका देवी मंदिर

रेणुका देवी, चिखली ची प्रतीमा
चिखली हे बुलढाणा जिल्ह्यातील एक गाव आहे. रेणुका देवी चिखलीची देवता आहे. रेणुका देवीचे मंदिर शहराच्या मध्यभागी आहे. मंदिर एक आश्चर्यकारक स्मारक आहे. चैत्र पोर्णिमा एक शुभ दिन आहे जेव्हा रेणुका देवी “यात्रा” आयोजित केली जाते. चिखली मध्ये, जुन्या शहरातील भगवान शिव मंदिर पाहण्याची आणखी एक जागा आहे. या ठिकाणाचा सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे महाजनचे जुने लाकूड आणि खडकांमध्ये तयार केलेल्या 100 पेक्षा जास्त खोल्या असलेले एक मोठे घर आहे
श्री क्षेत्र बुधनेश्वर येथे पैनगंगा नदीचे उगमस्थान आहे. आख्यायिका नुसार पैनगंगा चे महात्म्य असे सांगण्यात आले आहे की पूर्वी एकेकाळी सह्याद्री पर्वतावर गंगाजलाने भरलेला ब्रह्मदेवाचा कमंडलू सांडला तेव्हा पासून हे स्थान कुंडीका तीर्थ या नावाने प्रसिद्ध आहे. येथे एक शिलामय गृह आहे.

हनुमान मुर्ती नांदुरा

105 फूट उंच हनुमान मुर्ती, नांदुरा चे छायाचित्र
बुलढाणा शहरामधील नांदुरा तालुक्यात 105 फूट उंचीची सर्वात मोठी भगवान हनुमानाची मूर्ती आहे.
शहरातील हे प्रमुख पर्यटन आकर्षण आहे भगवान हनुमानाची मूर्ती पांढऱ्या संगमरवरी खडकाची असून योग्य ठिकाणी वेगवेगळ्या रंगांचा वापर केला जातो.
भगवान हनुमानच्या हाताला गदा आहे आणि उजवा हात भाविकांना आशीर्वाद देत आहे.
हि मूर्ती राष्ट्रीय महामार्ग क्र. वर ६ आहे.

गिरडा परिसर
अजिंठा पर्वत रागांमध्ये अध्यात्मिक पातळीवर नावाजलेला अन् निसर्गरम्य अशा डोंगरदऱ्यांमुळे गिरडा परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो

बुलढाणा जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १६ कि.मी. अंतरावर अजिंठा लेणी मार्गावर गिरडा हे गाव आहे. प्राचीन महादेव मंदिरामुळे या गावाला जुनी ओळख आहे. स्वयंप्रकाशबाबांच्या समाधीस्थळामुळेही गावाला अध्यात्मिक महत्‍त्व आहे. पांडव वनवासात असताना अर्जुनाने बाण मारुन इथे पिण्याच्या पाण्याचा स्रोत निर्माण केला. त्यातून पाच झरे निर्माण झाले. तेच पाणी गोमुखातून आजपर्यंत अव्याहतपणे बाहेर पडते, अशी अख्यायीका सांगितली जाते.

पंचझिरीचा निसर्गरम्य परिसर आणि त्याचे धार्मिक महत्‍त्व लक्षात घेत अध्यात्मिक केंद्राला पर्यटनाची जोड मिळाल्यामुळे आता या परिसरात सहलींचे आयोजनही केले जाते.

ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा खामगांव राज्य मार्गास लागून असलेल्या २०५ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरले आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात असलेले बोथा गाव जुने वनग्राम आहे.

अंबाबरवा अभयारण्य

अंबाबरवा नावाचे अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात सुमारे १२७ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरले आहे.

जिल्ह्य़ातील सातपुडा पर्वत रांगामध्ये, मध्यप्रदेश व मेळघाटच्या सीमावर्ती भागात असलेले अंबाबरवा अभयारण्य नैसर्गिक वैविध्यपूर्ण संपत्तीचे वरदान असून हे अभयारण्य जिल्ह्य़ातील प्रमुख वन पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाते.

राजूर घाट

शहराला लागून असलेल्या बुलढाणा-मलकापूर रस्त्यावरील राजूर घाट निसर्ग सौंदर्याने बहरलेला असून परिसरातील असलेल्या विविध मंदिरे, नदी, नाल्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर पडली आहे.

अजिंठ्याच्या डोंगरात वसलेल्या बुलढाणा शहर परिसराला अलैकिक सौंदर्याची देण असल्यामुळे तसेच थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे इंग्रजांनी आपल्या कार्यकाळात येथूनच जिल्ह्याचा कारभार सुरू केला होता. दरम्यान स्वातंत्र्यानंतर बुलढाणा शहराला जिल्ह्याचा दर्जा मिळाला. आज रोजी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी शहर परिसरात असलेले नैसर्गिक सौंदर्य दरवर्षी परिसरातील पर्यटक प्रेमींना खुणवत असते.

बुलढाणा शहरातून मलकापूरकडे जात असताना सर्वप्रथम व्यंकटगिरी बालाजीचे मंदिर आहे. तिरूमला येथील बालाजीची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली असून परिसरात डोंगर आहेत. राजूर घाटात एका वळणावर संकटमोचन हनुमान मंदिर आहे. या ठिकाणाहून बुलढाणा शहर परिसर तसेच राजूर घाटातील डोंगराचे सौंदर्य निहाळता येते. त्यानंतर मोताळा तालुक्यातील राजूर गावाकडे जाताना घाटातच दुर्गामाता मंदिर आहे.

या परिसरात खोल दरीतील पाणी साठवलेला नाला, सर्वत्र डोंगराने पांघरलेला हिरवा शालू तसेच मोताळा शहरासमोर असलेल्या नळगंगा धरणाचे पाण्याचे विशाल पात्र निसर्ग सौंदर्यात अधिकच भर घातले. या ठिकाणाहून सूर्योदय तसेच सुर्यास्तचे दर्शन घेताना वेगळी अनुभुती मिळते. त्यानंतर मोहेगाव समोर असलेल्या तालुका पर्यटन केंद्र तसेच त्यापुढे असलेल्या जमिनीखाली १५ फुट खोल असलेल्या महादेवाचे मंदिर आहे. या परिसरात नळगंगा नदीचे वाहणारे पाणी, परिसरातील हिवराई मनाला सुखावून जाते. दरवर्षी श्रावण महिन्यात बुलढाणा शहर परिसरातील अजिंठ्याच्या डोंगरातील निसर्गसौंदर्य पर्यटकांना हाक देत असते. या ठिकाणी इतर जिल्ह्यातील येणारे पर्यटकांनी भेट दिल्यास परत परत येथील निसर्ग सौंदर्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही.