गंगाधर गोपाळ गाडगीळ (ऑगस्ट २५, इ.स. १९२३ – सप्टेंबर १५, इ.स. २००८) हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना ‘नवकथेचे अध्वर्यू’ असे संबोधले जाते.