सामाजिक संस्थांवर दृष्टीक्षेप

‘दानं प्रसाद:’
“ येन केन विधि दीन्हे दान करइ कल्याण !” कोणत्याही प्रकारचे दान हे कल्याणकारी असतं.(रामचरित मानस /१०३)

सर्वच धर्म कमी-अधिक फरकाने लोकांसाठी किंवा समाजासाठी काय करावे, याची शिकवण देतात. त्या शिकवणीमध्ये दान हे सर्वप्रथम येते. ऋग्वेदामध्ये दानस्तुतीपर सुक्ते आली आहेत. ‘शरयतेजं कृती: दाक्ष: दानं ईश्वर भावश्च क्षात्रं कर्म’ ‘दानेन हरते व्याधिम्, बौद्ध उपासकही ‘दानं प्रसाद:’ हे बुद्धवचन मानतात.. , दानाच्या या संकल्पनेमागे सोशल कमिटमेंट आहे .

महाराष्ट्रापासुन दूर वसलेल्या आपल्या बांधवांना महाराष्ट्रात विविध क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने समाजसेवा करणाऱ्या संस्थांशी जोडणारा दुवा ‘मराठी ग्लोबल व्हिलेज’ ठरावा हा आमचा एक भाबडा प्रयत्न. सत्पात्री किंवा सात्त्विक दानामुळे मन स्वच्छ किंवा निर्मळ होते. काही सामाजिक संस्थांचा इथे समावेश करतोय. ह्या अवीर पणे काम करणार्‍या संस्थांना आपण आपापल्या पध्दतीने फुल ना फुलाची पाकळी मदत पाठवू शकता. त्यासाठी त्यांचे संपर्क ठिकाण आणि क्रमांक देत आहोत. आपण त्यांच्याशी थेट सवाद साधू शकता..आपली मदत पोहचवू शकता….

चला तर तेंव्हा दानक्रांती घडवू या.. कारण ,

दानधर्म , जाणिजें यज्ञकर्म॥  हेच पुण्यकर्म, यज्ञकर्म..