मराठीतील बोलीभाषा

भारत देशात मराठी बोलणारी माणसे जवळपास सगळ्या राज्यांत विखुरलेली आहेत.

जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच, मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेली, तिची बोलीभाषा दर १२ कोसांगणिक उच्चारांत, शब्दसंग्रहांत, आघातांत व वाक्प्रचारांत बदलत रहाते. असे असले तरी लिखित भाषेत फारसा फरक नसतो.

पिढ्या न्‌ पिढ्या विशिष्ट राज्यात स्थायिक झाल्यामुळे मराठी भाषकांच्या यांच्या मूळ मराठी बोलीवर त्या राज्याच्या स्थानिक भाषेचा ठसा सुस्पष्टपणे उमटलेला दिसतो. त्यामुळे ‘ मी मराठी बोलतो’ असे कुणी विधान केले तर ‘ कुठली मराठी बोलता?’ असा प्रश्न आपोआपच उपस्थित होतो. कारण मूळ मराठी भाषेचे व्याकरण जरी एकच असले तरी स्थानमाहात्म्यानुसार मराठी बोलीचे ‘ कोंकणी मराठी ‘ – [ हीतही पांचदहा प्रकार आहेत ], कोल्हापुरी मराठी, कारवारी मराठी, अहिराणी, मराठवाडी, नागपुरी, असे अनेकविध प्रकार कानांवर पडत असतात. ह्या प्रत्येक प्रकारात त्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकजीवनातले अनेक शब्द आलेले दिसतात, जे लहान शब्दकोषात सापडतीलच असे नाही. [१]भौगोलिक परिसरा नुसार कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी, मराठवाडी, कोकणी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर, बगलांनी, नंदुरबारी, खाल्यांन्गी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी असे बोलींचे आणखी उपप्रकार होतात.

आदिवासी बोलीभाषा

महाराष्ट्रात गोंड, भिल्ल, वारली, पावरी, मावची, कोरकू, कोलामी, कातकरी, माडिया आदी बोलीभाषा प्रमुख आहेत. या बोलीभाषा महत्त्वाच्या असल्या, तरी यापैकी गोंडी व भिल्ली या बोलीभाषा अतिप्राचीन आहेत. गोंडी बोलीभाषा महाराष्ट्रात प्राधान्याने आणि मध्य भारतातील मोठ्या विस्तृत पट्ट्यात बोलली जाते. चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात व आंध्र प्रदेशाच्या सीमेलगतही गोंडी बोली बोलली जाते. महाराष्ट्रातील आदिवासी बोलींमध्ये गोंडी बोली सर्वाधिक बोलली जाते. गोंडी बोलीला लिपी असल्याचे पुरावेही अलीकडचे काही संशोधक देत आहेत. गोंडी बोलीभाषेचा बारकाईने अभ्यास करणारा जर्मन भाषातज्ञ जूल ब्लाॅच याने गोंडी बोलीची आंतरराष्ट्रीयता शोधून काढण्याचा प्रयत्न केला होता. द्राविडी भाषासमूहातील कोणत्याही भाषेची अभिन्न वैशिष्ट्ये धारण करणारी गोंडी ही एकमेव प्राचीन बोलीभाषा आहे असे मत काॅल्डवेलने गोंडी भाषेच्या सात वैय्याकरणीय कसोट्या लावून मांडले होते.

भिल्ली बोलीभाषा गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये बोलली जाते. या बोलीवर त्या त्या राज्यांच्या प्रमाण भाषेचा प्रभाव असल्याने महाराष्ट्रात ती मराठीची बोलीभाषा म्हणून गणली जाते.

समूहानुसार होणारे उपप्रकार

नंदीवाले, नाथपंथी देवरी, नॉ लिंग-मुरूड-कोलाई-रायगड,पांचाळविश्वकर्मा, गामीत, ह(ल/ळ)बी, माडिया, मल्हार कोळी, मांगेली, मांगगारुडी, मठवाडी, मावची, टकाडी, ठा(क/कु)री, ‘आरे मराठी’, जिप्सी बोली(बंजारा), कोलाम/मी, यवतमाळी (दखनी), मिरज (दख्खनी), जव्हार, पोवारी, पावरा, भिल्ली, धामी, छत्तीसगडी, भिल्ली (नासिक), बागलाणी, भिल्ली (खानदेश), भिल्ली (सातपुडा), देहवाळी, कोटली, भिल्ली (निमार),कोहळी, कातकरी, कोकणा, कोरकू, परधानी, भिलालांची निमाडी, मथवाडी, मल्हार कोळी, माडिया, वारली, हलबी, ढोरकोळी, कुचकोरवी, कोल्हाटी, गोल्ला, गोसावी, घिसाडी, चितोडिया, छप्परबंद, डोंबारी, नाथपंथी डवरी, पारोशी मांग, बेलदार, वडारी, वैदू, दखनी उर्दू, महाराष्ट्रीय सिंधी, मेहाली, सिद्दी, बाणकोटी,चित्पावनी, वाघ्ररी / वाघरी, पारधी, गोंडी,गोरमाठी,लेवा,डांगी,वाडवळ / वडवली/ळी, कैकाडी,अहिराणी, कदोडी / सामवेदी, तावडी, आगरी, देहवाली, जुदाव, महाराऊ, भिलाऊ, लाड सिक्की, लेवापातीदार, गुजरी, वगैरे.

मराठवाडी –

मराठवाडा प्रदेशात ही ठसकेबाज मराठी भाषा वापरली ज़ाते. सहसा गावठी किंवा शिवराळ पणा हे वैशिष्ट्य मराठवाड्यातल्या मराठी चे समज़ले ज़ाते. नांदेड जिल्ह्यात तेलंगणा राज्याला लागून असल्याने एक वेगळाच़ हेलका धरला ज़ातो. तर महाराष्ट्र – कर्नाटक सीमावर्ती भागातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात थोडी वेगळी भाषा बोलली ज़ाते. लातूरी भाषेत काही वेळा क्रियापदांवर कानडी भाषेच़ा परिणाम होतो, परंतु प्रभाव मात्र नाही. या भाषेत उर्दू शब्दही आढळतात. ‘लाव’, ‘आव’ या स्वरूपाच़े कारकवाचक प्रत्यय या बोलीच़े वेगळेपण दाखवतात. उदा. जेवलालाव, च़ाल्लाव, ठिवताव इत्यादी.

मालवणी –

दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बोलली जाणारी ही बोली आहे. या बोलीस कुडाळी असेही म्हणतात. हेल काढून आलेले अनुनासीक उच्चार हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. दशावतार या नाट्याचे सादरीकरण या भाषेतच केले जाते. मच्छिंद्र कांबळी यांच्या मालवणी नाटकांमुळे ही भाषा जास्त प्रसिद्धी पावली. मालवणी बोलीत अनेक वैशिष्टय़पूर्ण शब्द आहेत. जसे की, झिल (मुलगा), चेडू (मुलगी), घोव (नवरा).

झाडीबोली –

भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हा चार जिल्ह्य़ांचा भूप्रदेश ‘झाडीपट्टी’ म्हणून ओळखला जातो. या भागातील बोलीभाषेला झाडीबोली असे म्हणतात. मराठीतील ‘ण, छ, श, ष आणि ळ’ ही पाच व्यंजने झाडीबोलीत वापरली जात नाहीत. मराठीतील आद्यग्रंथ मुकुंदराजकृत ‘विवेकसिंधू’मधील अनेक अपरिचित शब्द आजही झाडीबोलीत प्रचारात आहेत.

नागपुरी –

पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांचे काही भाग आणि गडचिरोलीचा काही भाग तसेच भंडारा (गोंदिया) या जिल्हय़ांत बोलली जाणारी नागपुरी ही काहीशी निराळी बोली आहे. तसेच मध्य प्रदेशातील शिवनी, छिंदवाडा, बालाघाट व रायपूर या भागातही ही बोली प्रचलित आहे. वऱ्हाडी आणि झाडीबोलीतील अनेक शब्द यात असले तरी ही बोली वेगळी आहे. नागपुरीला वऱ्हाडी भाषेचेच एक रूप मानल्याने नागपुरी बोलीचा स्वतंत्र भाषिक अभ्यास झाला नाही. परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली जाते. यावर हिंदी शब्दांचाही प्रभाव आढळतो.

अहिराणी –

जळगाव जिल्हा सावळदबारा, बुलढाणा जिल्हा, मलकापूर ते मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, शहापूर, अंतुर्लीपर्यंतच्या विस्तृत भूप्रदेशात ही बोलीभाषा प्रचलित आहे. शब्दांमध्ये नाद आणि लय हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. भालचंद्र नेमाडे, ना. धों. महानोर, के.नारखेडे या लेखकांनी आपल्या साहित्यात बोलीचा वापर केला आहे.

तावडी –

जामनेर, भुसावळ, जळगाव, बांदवर, रावेर, यावल तालुका या भागात तावडी बोली प्रचलित आहे. तावडी बोलीत मोठय़ा प्रमाणात आहेत. ‘क’ च्या जागी ‘ख’चा उच्चार केला जातो. उदाहरणार्थ- डोखं (डोकं), मोखा (मोका). बहिणाबाई चौधरींच्या कवितांमधून तावडी बोलीचा आविष्कार दिसतो. पुर्वी या बोलीला अहिराणी समजत असत परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली गेली.

आगरी –

आगरी बोली ही महाराष्ट्राच्या राज्याच्या उत्तर आणि मध्य कोकणात बोलली जाते. आगरामधले आगरी, गवळी व कुणबी तसेच किनारपट्टीवरील कोळी, खारवी, भंडारी व भोई ही बोली बोलतात. रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये ही आगरी बोलणारे लोक प्रामुख्याने आढळतात.

चंदगडी –

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशातील अनेक गावांची ही भाषा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भागात ही भाषा प्रचलित आहे. या भूभागात दोन भिन्न भाषा-बोलींचा संपर्क, विविध राजकीय अंमल, मराठी, कन्नड आणि कोकणी भाषेच्या प्रभावाखाली तयार झालेली ही एक बोली भाषा आहे. उच्चाराचा विशिष्ट हेल, सुरावट आणि निराळे व्याकरण हे या भाषेत दिसून येते. चंदगड तालुक्याचा पश्चिम भाग, दोडामार्ग-सावंतवाडी तालुक्याच्या सीमेलगतची गावे, आजरा तालुक्याच्या दक्षिण भागातील गावे ती कोकणीच्या प्रभावाने तयार झालेली बोली वापरतात. चंदगडच्या पूर्व भागात आणि बेळगाव परिसरातील गावांमध्ये कन्नड भाषेच्या प्रभावाने तयार झालेली बोली वापरात आहे. या मध्ये ‘मिय्या जेवलो’ (मी जेवले), ‘मिय्या बाजारास गेल्लो'(मी बाजारात गेले) अशी शब्द रचना दिसते. तसेच ‘कोठे’ऐवजी ‘खट्टे’ असा शब्द ऐकू येतो.

वऱ्हाडी – बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या सहा जिल्ह्य़ांतून वऱ्हाडी बोलली जाते. म्हाइंभट यांचा ‘लीळाचरित्र’ हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ वऱ्हाडी बोलीत लिहिला गेला. महानुभाव पंथातील अनेक रचना याच बोलीतून झाल्या आहेत. प्रमाण मराठीतील ‘ड’चा ‘ळ’, ‘ळ’चा ‘य’ या बोलीत केला जातो. जसे, ‘नदीच्या गायात, गाय फसली’ (नदीच्या गाळात गाय फसली). तसेच जो हा प्रत्यय असलेली देईजो, येईजो, घेईजो अशी रूपे येतात. फारशी व हिंदीचा प्रभाव या बोलीवर आहे.

देहवाली –

भिल्ल समाजात ही बोली आढळते. गुजराती आणि हिंदी भाषेचा यावर मोठा प्रभाव आढळतो. बोलीची गुजरातीशी वाक्यरचनाही मिळतीजुळती आहे. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या भागात ही बोली वापरात आहे. या भाषेचे खळवाड आणि मेवासी असे दोन पोटप्रकारही आहेत. देहवाली च्या मूळ स्वरात ‘ळ’, ‘क्ष’ आणि ‘ज्ञ’ ही व्यंजने नाहीत, तर ‘छ’, ‘श’ आणि ‘ष’ यांच्याऐवजी ‘स’ हे एकच व्यंजन वापरले जाते. या भाषेचे अभ्यासक चामुलाल राठवा यांनी देहवाली मौखिक साहित्य शब्दबद्ध केले आहे. विश्राम वळवी, देवेंद्र सावे, बळवंत वळवी, सोबजी गावीत यांनी या भाषेत लेखन केले आहे. भाषासाहित्य प्रकल्पाअंतर्गत अकादमी द्वारे हे प्रसिद्धही झाले आहेत.

कोल्हापुरी –

कोल्हापुर भागात बोलली जाणारी ही बोली आहे. बोलीभाषापैकी कोल्हापुरी मराठी बोली ही निष्कपट, गरीब, खेडवळ, अशिक्षित शेतकऱ्याची बोली आहे. लय काढून बोलण्याची लकब या भागात आढळते. तसेच कोकणी भाषेचा प्रभाव यावर दिसतो. भाषेत रांगडेपणा व शिव्यांचा वापर आढळतो. श्रीविष्णूच्या गर्भश्रीमंत तिरुपति रूपापेक्षा, त्याच्या अस्सल शेतकरी वेषातल्या पंढरपूरच्या विठोबाच्या रूपाला, अथवा श्रीशंकराच्या मल्हारी /खंडोबाला मनोभावे भजणाऱ्या- पुजणाऱ्या रांगड्या शेतकऱ्यांच्या मुखांतून उमटणारी ही बोलीभाषा आहे. मराठी भाषेच्या विविध धाटणींच्या बोलींपैकी पुणेरी मराठी बोली ही ज्यास्तीत ज्यास्त व्याकरणशुद्ध म्हणून ओंळखली जाते, तथापि ती बहुतांशी लेखी लिपीनुसार बोलली जात असल्यामुळे ऐकण्यास नाटकी आणि सपक वाटते.  तुलनेने ह्या अस्सल रांगड्या भाषेतल्या बोली कानांना अधिक रसरशीत, ठंसकेबाज आणि दमदार वाटतात. तिरुपती आणि विठोबातल्या फरकासारखाच हाही फरक आहे.

बेळगावी –

बेळगाव या सीमाभागातील ही बोलीभाषा ही कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा अनेक बोलींच्या मिश्रणातून तयार झालेली आहे. या भाषेतील गोडव्याची ओळख पु.ल. देशपांडे यांच्या रावसाहेब या कथेने करून दिली. त्याच बरोबर भीमराव गस्ती, नारायण अतिवाडकर या साहित्यिकांनीही या भाषेतून लेखन केले आहे. प्रकाश संत लिखित लंपन या व्यक्तिचित्रात या भाषेला विपुल वापर आढळतो. जसे काय लंपूसाहेब, ओठ बाहेर काढून बसून सोडलात आज, सक्काळी सक्काळी.. एकदम मज्जा ऐद नोडरी ऽऽ अभ्यास इल्ला एन इल्ला… या भाषेत गा हा प्रत्यय लावला जातो जसे ‘काय गा कव्वा येत्यास?’ (काय, केव्हा येणार?)

वाडवळी –

उत्तर कोकणातील ठाणे जिल्ह्य़ात सागरी किनाऱ्यालगतच्या भागात वाडवळी बोली बोलली जाते. या भागात सोमवंशी पाठारे क्षत्रिय व सोमंवशी क्षत्रिय समाजास शेतीवाडी हा व्यवसाय करणारे म्हणून ‘वाडवळ’ असे नामाभिधान पडले आहे. या समाजाच्या बोलीभाषेस ‘वाडवळी’ असे संबोधले जाते. तिचा उगम आणि विकास बहुतांशी ठाणे जिल्ह्यात झालेला दिसतो. ही बोली वसई परिसरात बोलली जाते.

कोंकणी –

कोकणी या नावाने ओळखल्या ज़ाणाऱ्या अनेक बोली आहेत. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातली आगरी,कोळी, वाडवळ, कादोडी, ईस्ट ईंडियन, बाणकोटी, वारली, कोकणा, कातकरी, रत्‍नागिरी जिल्ह्यातली संगमेश्वरी, चित्पावनी, सिंधुदुर्गातली मालवणी, गोव्यातले श्रीमंत हिंदू शेतकरी बोलतात ती काणकोणची कोकणी, तिथल्याच़ शेतमजुरांची कोकणी, गोव्यातल्या ख्रिश्चनांची पोर्तुगीज पद्धतीची कोकणी, गावड्यांची कोकणी, कारवार जिल्ह्यातली कारवारी, या सर्व बोली ठोकरीत्या कोकणी बोली समजल्या जातात, पण निश्चितपणे एकमेकांपासून वेगळ्या आहेत. या बोलींपैकी गोव्यातल्या स्थानिक पॊर्तुगीज/ख्रिश्चन बोलत असलेल्या एका बोलीला राज्यभाषा केले आहे.

खानदेशी

ही बोलू जळगाव जिल्हा व लगतच्या धुळे जिल्ह्यात बोलली जाते.

डांगी –

तंजावर मराठी –

ही मराठी भाषेचीच़ एक बोली असून ती भारतातील तमिळनाडू ह्या राज्यात बोलली ज़ाते. ज़वळपास एक लाखाहून अधिक लोक ही भाषा रोजच्या व्यवहारात उपयोगात आणतात. तमिळनाडू राज्यातील तंजावर किंवा तंजावूर ह्या नगरातील ही एक बोलीभाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे ह्यांच्यासोबत दक्षिणेत स्वारीसाठी गेलेली जी मराठी माणसे तंजावरला पिढ्यानपिढ्या स्थायिक झाली, त्यांची ही मातृभाषा आहे. ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण भाषा असून त्यात आज़ही बरेचसे प्राचीन मराठी शब्द वापरात आहेत. तसेच काळाचा ओघात पडलेला स्थानिक तमिळ भाषेच़ा प्रभाव ह्या भाषेवर ज़ाणवतो.

नंदभाषा –

व्यापार करताना इतरांना कळू नये म्हणून व्यापारी ’ही एक सांकेतिक भाषा इतिहासात वापरत होती. आज़ही काही ठिकाणी वापरात आहे. त्या भाषेमध्ये चलनाच्या उल्लेखांसाठी निराळे शब्द आहेत. उदाहरणार्थ भुरका – एक, आवरू – दोन, उधानू – तीन, पोकू – चार, मुळू – पाच, शेली – सहा वगैरे. विसोबा खेचर (नामदेवांचे गुरू) यांनी या नंदभाषेच़ा वापर करून शंकराची स्तुती करणाऱ्या काव्यरचनाही केल्या आहेत.

नागपुरी –

पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूरच़ा काही भाग आणि गडचिरोलीच़ा काही भाग तसेच भंडारा (गोंदिया) या जिल्ह्यांत बोलली जाणारी नागपुरी ही काहीशी निराळी बोली आहे. तसेच मध्य प्रदेशातील शिवनी, छिंदवाडा, बालाघाट व रायपूर या भागातही ही बोली प्रचलित आहे. वर्‍हाडी आणि झ़ाडीबोलीतील अनेक शब्द यात असले तरी ही बोली वेगळी आहे. नागपुरीला वर्‍हाडी भाषेचेच़ एक रूप मानल्याने नागपुरी बोलीच़ा स्वतंत्र भाषिक अभ्यास झाला नाही. परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली ज़ाते. यावर हिंदी शब्दांच़ाही प्रभाव आढळतो.

नारायणपेठी बोली –

महाराष्ट्रातील स्वकुळ साळी समाजाची बोली. आंध्र प्रदेशातून येऊन देशभर विखुरलेले मराठी विणकर ही बोलीबाषा बोलतात.

बेळगावी –

बेळगाव या महाराष्ट्राचा सीमाभागातील ही बोलीभाषा ही कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा अनेक बोलींचा मिश्रणातून तयार झालेली आहे. या भाषेतील गोडव्याची ओळख पु.ल. देशपांडे यांचा रावसाहेब या कथेने करून दिली. त्याच़ बरोबर भीमराव गस्ती, नारायण अतिवाडकर या साहित्यिकांनीही या भाषेतून लेखन केले आहे. प्रकाश संत लिखित लंपन या व्यक्तीचित्रात या भाषेला विपूल वापर आढळतो. ज़से काय लंपूसाहेब, ओठ बाहेर काढून बसून सोडलात आज़, सक्काळी सक्काळी.. एकदम मज्जा ऐद नोडरी ऽऽ अभ्यास इल्ला एन इल्ला… या भाषेत गा हा प्रत्यय लावला ज़ातो ज़से ‘काय गा कव्वा येत्यास?’ (काय, केव्हा येणार?)

भटक्‍या विमुक्त –

ज़मातींच्या मराठी संलग्न बोली आहेत. यांना पारूशी असेही संबोधन आहे. यामध्ये गोंधळी, कुडमुडे जोशी, गोसावी, भराडी, गोपाळ, शिकलगार, वैदू, नंदीवाले, बेलदार, कोल्हाटी आदी भटक्‍या ज़माती येतात. सदैव भ्रमणात राहिल्याने यांच्या बोलीमध्ये विविध शब्द आहेत. आपली कौशल्ये आपल्याच ज़मातीत रहावीत यासाठी या बोली भाषांच़ा उपयोग केला जातो. भाषेतील शब्द उदाहरण मावशी म्हणजे माची. शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभागातील डॉ. विश्‍वनाथ शिंदे यांनी या भाषांवर संशोधन केले आहे.

वर्‍हाडी –

बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या सहा जिल्ह्यांतून वर्‍हाडी बोलली ज़ाते.मूळ मराठी ही बोली कुठल्याही प्रकारच़ा हेल न काढता,अनुनासीक इ.चा अतिरेक न करता अत्यंत संथपणे बोलली ज़ाते.नवीन ऐकणाऱ्याला तिच़े कौतुक वाटते.प्रमाण मराठीतील काही शब्दात बदल होत असल्यामुळे ती थोडी अशुध्द वाटते. म्हाइंभट यांच़ा ‘लीळाचरित्र’ हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ वर्‍हाडी बोलीत लिहिला गेला. महानुभाव पंथातील अनेक रचना याच़ बोलीतून झ़ाल्या आहेत. प्रमाण मराठीतील ‘ड’चा ‘ळ’, ‘ळ’चा ‘य’ या बोलीत केला ज़ातो. ज़से, ‘नदीचा गायात, गाय फसली’ (नदीचा गाळात गाय फसली). तसेच जो हा प्रत्यय असलेली देईज़ो, येईज़ो, घेईज़ो अशी रूपे येतात. फारशी व हिंदीचा प्रभाव या बोलीवर आहे.

कोळी –

मुख्यतः महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, अलिबाग तसेच गुजरातमधील उमरगाव, दादरा नगर हवेली आणि गोव्यात त्याच़बरोबर संपूर्ण कोकणातील किनारपट्यांवर सर्रास कोळी भाषा बोलली ज़ाते. कोळी ज़ातीतील अनेक उपज़ातींमध्ये थोड्याफार भाषेचे फरक पडतात ज़से, कोळी, मांगेली, वैती, आगरी इ..या भाषेत ” ळ ” उच्चार ” ल ” ने केला ज़ातो. फक्त ह्या कोळीतील ” मांगेली ” भाषेत ” ळ ” ची स्पष्ट सिद्ध होते. त्याचबरोबर ह्या भाषेत मराठी, गुजराती, हिंदी आणि फारशी भाषेच़े शब्द दडलेले आहेत.शब्दशः ” त्याने जेवण केलं होतं ” ( त्यान जेवण करीलता ), ” तुम्हाला काहीतरी सांगायच़ं आहे ” ( तुमाना कायतरी हांग्याय ).

प्रादेशिक प्रदेशानुसार

काणकोणची कोकणी  ·  · कोकणी  ·  · खानदेशी  ·  · चंदगडी  ·  · तंजावर मराठी  ·  · तावडी  ·  · बाणकोटी  ·  · बेळगावी मराठी ·  · मालवणी  ·  · वर्‍हाडी  ·  · पूर्व मावळी बोलीभाषा  ·  · कोल्हापुरी ·  · सोलापुरी  ·  · गडहिंग्लज (पूर्व)

सामाजिक प्रदेशानुसार

ईस्ट इंडियन,मुंबई  अहिराणी  ·  ·आगरी  ·  ·कादोडी  ·   कोलामी  ·   चित्पावनी  ·  ·जुदाव मराठी  ·   नारायणपेठी बोली  ·   वाघरी  ·  ·नंदीवाले बोलीभाषा ·   नाथपंथी देवरी बोलीभाषा ·  ·नॉ लिंग बोलीभाषा-मुरूड-कोलाई-रायगड ·  ·पांचाळविश्वकर्मा बोलीभाषा ·  ·गामीत बोलीभाषा ·  ·ह(ल/ळ)बी बोलीभाषा ·   माडीया बोलीभाषा ·   मल्हार कोळी बोलीभाषा ·   मांगेली बोलीभाषा ·  ·मांगगारुडी बोलीभाषा ·   मठवाडी बोलीभाषा ·  ·मावची बोलीभाषा ·  ·टकाडी बोलीभाषा ·   ठा(क/कु)री बोलीभाषा ·   ‘आरे मराठी बोलीभाषा ·  ·जिप्सी बोली(बंजारा) बोलीभाषा ·  ·कोलाम/मी बोलीभाषा ·   यवतमाळी (दखनी) बोलीभाषा · · मिरज (दख्खनी) बोलीभाषा ·  ·जव्हार बोलीभाषा ·   पोवारी बोलीभाषा ·   पावरा बोलीभाषा ·  ·भिल्ली बोलीभाषा ·  · धामी बोलीभाषा ·  ·छत्तीसगडी बोलीभाषा ·   भिल्ली (नासिक) बोलीभाषा ·   बागलाणी बोलीभाषा ·  ·भिल्ली (खानदेश) बोलीभाषा ·  भिल्ली (सातपुडा) बोलीभाषा ·  ·देहवाळी बोलीभाषा ·  कोटली बोलीभाषा ·   भिल्ली (निमार) बोलीभाषा ·  कोहळी बोलीभाषा ·   कातकरी बोलीभाषा ·   कोकणा बोलीभाषा ·  ·कोरकू बोलीभाषा ·  परधानी बोलीभाषा ·   भिलालांची निमाडी बोलीभाषा ·  मथवाडी बोलीभाषा ·   मल्हार कोळी बोलीभाषा ·   माडिया बोलीभाषा ·  ·वारली बोलीभाषा · ·हलबी बोलीभाषा ·  ढोरकोळी बोलीभाषा ·  कुचकोरवी बोलीभाषा ·   कोल्हाटी बोलीभाषा ·   गोल्ला बोलीभाषा ·   गोसावी बोलीभाषा ·   घिसाडी बोलीभाषा ·  चितोडिया बोलीभाषा ·   छप्परबंद बोलीभाषा ·   डोंबारी बोलीभाषा ·  नाथपंथी डवरी बोलीभाषा ·  पारोशी मांग बोलीभाषा ·   बेलदार बोलीभाषा ·  ·वडारी बोलीभाषा ·   वैदू बोलीभाषा ·   दखनी उर्दू बोलीभाषा ·   महाराष्ट्रीय सिंधी बोलीभाषा ·   मेहाली बोलीभाषा ·   सिद्दी बोलीभाषा ·   बाणकोटी बोलीभाषा  ·  क्षत्रीय बोलीभाषा  ·  पद्ये बोलीभाषा