पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मिळला. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवणीद्वारे घेतले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरीता गेले.

महात्मा गांधीं यांचे विचारांनी प्रेरीत

१९१२ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली. कमला नेहरू यांच्याशी त्यांनी १९१६ साली विवाह केला. १९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर कॉंग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. ते महात्मा गांधीजींच्या विचारांचे समर्थक होते. १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरीत झाले. जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या वडिलांनी आपल्या संपत्तीचा आणि विदेशी वस्तूंचा त्याग केला व स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करून स्वातंत्र्यचळवळीला प्रोत्साहन दिलं. ते खादीचा वापर करू लागले.

१९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरु केली. १९२९ साली पं. नेहरू भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्याचे ध्येय्य निश्चित केले गेले. ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा केली. पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. अनेक आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यात त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल त्यांना १९५५ मध्ये ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

पंडित जवाहरलाल नेहरु यांना मुलं प्रेमानं ”चाचा नेहरु” म्हणत. मुलं आणि फुलं हा
पंडितजींच्या हृदयातील एक अमुल्य ठेवा होता. मुलं ही देशाची खरी संपत्ती आहे, या दृष्टीकोनातून नेहरुंनी आपल्या विकास कार्यक्रमात बाल कल्याणाच्या उपक्रमांना नेहमीच अग्रक्रम दिला. ”मुलं काय शिकतात यापेक्षा त्यांच्यावर कोणते संस्कार होतात, हे पालक व शिक्षकांनी पाहिलं पाहिजे”, याबाबत ते आग्रही असत. 14 नोव्हेंबर हा नेहरुंचा जयंतीदिन खर्‍या अर्थाने ‘बालदिन’ म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. पंडित नेहरुंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख…

संस्कृत पंडित म्हणून ख्याती

नेहरु घराणं हे मुळचं काश्मिरातलं. त्यांच्या पुर्वजांची संस्कृत पंडित म्हणून जनमानसात ख्याती होती, म्हणूनच सारस्वत ब्राह्मण असलेल्या या घराण्याला ‘पंडित’ म्हणण्याचा प्रघात होता. अलाहाबाद येथील त्यांच आनंदभवन राजेरजवाड्यांनाही मोह पडल इतकं भव्य व आकर्षक होत. मोतीलाल व स्वरुपराणी या समृद्ध व सुखी दांपत्याला 14 नोव्हेंबर 1889 रोजी पुत्ररत्नाचा लाभ झाला. पंडित जवाहरलाल नेहरु यांचे शिक्षण विलायतेत झालं होतं, तरी देखील हिंदुस्थानातून ब्रिटिश राजवटीचा शेवट कसा होईलयांचा त्यांना सदैव ध्यास असे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत बॅरिस्टर पदवी संपादन केल्यावर त्यांनी काही काळ वकिली केली. त्यानंतर त्यांनी गांधीजींच्या ब्रिटीश सरकारविरुद्ध पुकारलेल्या असहकार चळवळीत उडी घेतली.

ऑगस्ट क्रांतीचा वणवा

मुंबईच्या गवालिया टँक येथील ऑगस्ट क्रांती मैदानावर 8 ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन भरलं होतं. याप्रसंगी महात्मा गांधी, मौलाना आझाद सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ब्रिटिश राजवटीला आव्हान देण्याचा निर्णय घेऊन त्यांना चलेजाव चा सज्जड इशारा दिला. यावेळी नेहरु आपल्या भाषणात म्हणाले की, ”या लढ्यात आता माघार नाही. यात आम्ही विजय मिळवून आझाद हिंदुस्थानाच्या भूमीवर उभे राहू, अन्यथा खवळलेल्या महासागरात बुडून जगातून नाहिसे होऊ.” करेंगे या मरेंगे अशी निर्वाणीची घोषणा करुन त्यांनी जनमानसाच्या अंत:करणात क्रांतीची प्रखर ज्योत प्रज्वलित केली.

इंदिराजींची उत्तम जडणघडण

प्रत्येक देशातील ज्येष्ठ नेते व तेथील परराष्ट्रीय धोरणाची माहिती व्हावी, यासाठी नेहरु हे इंदिरा गांधींना आपल्यासोबत परदेश दौर्‍यात नेत असात. त्यामुळे इंदिराजींची आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नेत्यांशी ओळख झाली. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य लढ्याची तसेच त्यातील ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांचा परिचय व्हावा, याकरिता नेहरुनी इंदिराजींना महात्मा गांधीच्या सहवासात ठेवलं. त्यामुळे इंदिराजींच्या मनात क्रांतीची भावना निर्माण होऊन त्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाल्या व त्यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला. पंडितजींनी इंदिराजींची बौद्धिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय जडणघडण उत्तमरित्या केल्याने त्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकल्या. इतकेच नव्हे तर त्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नेत्या म्हणून गणल्या गेल्या.

अलिप्तवाटी राष्ट्रगटाची उभारणी

नेहरु हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार होते. 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर नेहरु हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. पराराष्ट्र खातं त्यांनी आपल्याकडेच ठेवलं. अमेरिका व रशिया या दोन महाशक्तिंशी नेहरुंचे मित्रत्त्वाचे संबंध असल्याने एकाशी मैत्री, तर दुसर्‍याशी शत्रूत्त्व करण्यात त्यांना स्वारस्य नव्हतं. यासाठी त्यांनी अलिप्तवादी धोरण अंगिकारले. देशा-देशांमधील कोणताही वाद-तंटा शांततेने, वाटाघाटीवरुन, सामोपचाराने सोडविण्याचे कौशल्य पंडितजींच्या अंगी होत. ब्रिटनचे तत्कालिन पंतप्रधान विल्यम चर्चिल यांनी You are the light of Asia या शब्दात नेहरुंचा गौरव केला. पं‍डीतजींच्या आंतरराष्ट्रीय किर्तीची ही पावतीच ठरली. राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी नेहरुंना 1955 साली भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केले.