ठळक घटना

१६९९: गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.

१७३१: छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.

१७३१ : इतिहासप्रसिध्द वारणेचा तह होऊन शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याचे दोन भाग झाले.

१७७२ : वॉरन हेस्टींग्ज यांची गव्हर्नर जनरल म्हणून कलकत्ता येथे नेमणूक.

१८४९: हंगेरी देश प्रजासत्ताक बनला.

१९१९ : जालियानवाला बागची कत्तल –भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला.३७९ ठार

१९४२: व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.

१९६०: अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला.

१९९७: मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.

२०१६:सुशीला कार्की यांची नेपाळ सुप्रीम कोर्टात प्रथम महिला मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती

जन्म

१७४३: अमेरिकेचे ३रे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन. (मृत्यू: ४ जुलै १८२६)

१८९५: भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९७८)

१९०५: इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचा जन्म.

१९०६: आयरिश लेखक, नाटककार आणि कवी सॅम्युअल बेकेट यांचा जन्म.

१९१३ : दत्ताजी ताम्हाणे, स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी विचारवंत.

१९२२: टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे . (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९९)

१९४०: राज्यसभा सदस्य नजमा हेपतुल्ला यांचा जन्म.

१९५६: अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा जन्म.

१९६३: रशियन बुद्धिबळपटू गॅरी कास्पारॉव्ह यांचा जन्म.

मृत्यू

१९५१: औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी . (जन्म: २४ ऑक्टोबर १८६८)

१९७३: अभिनेता दिग्दर्शक बलराज सहानी . (जन्म: १ मे १९१३)

१९७३: भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक अनंत काकबा प्रियोळकर. (जन्म: ५ सप्टेंबर १८९५)

१९८८: महाराष्ट्र केसरी हिरामण बनकर यांचे निधन.

१९९९: कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले .

२०००: चित्रपट निर्माते व वितरक बाळासाहेब सरपोतदार.

२००८: संगीतकार दशरथ पुजारी. (जन्म: ३० ऑगस्ट १९३० – बडोदा, गुजराथ)