१६७९: सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.
१८१४: दुसर्‍या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने उंदेरी-खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.
१८२२: ब्राझिलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९०६: बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.
१९२३: इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.
१९३१: दुसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
१९५३: निकिता ख्रुश्चेव सोविएत संघाच्या सर्वेसर्वापदी.
१९७८: मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.
१९७९: दिवाळखोरी टाळण्यासाठी ख्रायसलर कॉर्पोरेशन ने अमेरिकन सरकारकडे १.५ बिलियन डॉलर्सची मागणी केली.
२००५: इजिप्तमधे पहिल्यांदाच बहुपक्षीय सार्वत्रिक निवडणुका.

१६०१: विल्यम शेक्सपियर यांचे वडील जॉन शेक्सपियर .
१८०९: थायलंडचा राजा बुद्ध योद्फा चुलालोके.
१९५३:भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ फुलारी ऊर्फ बी. रघुनाथ– लेखक व कवी (जन्म: १५ ऑगस्ट १९१३)
१९७९: जनार्दन ग्यानोबा तथा जे. जी. नवले –भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक(जन्म: ७ डिसेंबर १९०२)
१९९१: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी . (जन्म: ५ जून १९०८)
१९९४: टेरेन्स यंग, चिनी –इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार (जन्म: २० जून १९१५)
१९९७: मुकूल आनंद –तांत्रिक करामतीचे जादूगार म्हणून नाव कमावलेले हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म: ११ आक्टोबर १९५१)