वीरसेन आनंदराव कदम ऊर्फ बाबा कदम (मे ४, १९२९ : अक्कलकोट, महाराष्ट्र – ऑक्टोबर २०, २००९) हे मराठी लेखक होते. शिकार कथेच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ साहित्यिक बाबा कदम यांनी ८० च्या दशकात मराठी साहित्य क्षेत्रात मनोरंजनात्मक कथांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.