तलवारबाजी

तलवारबाजीमध्ये दोन प्रकार जास्त दिसतात. एक म्हणजे दांडपट्टा आणि दुसरी साधारण तलवारबाजी, ज्यात साधारणपणे तलवारीऐवजी लाठी वापरली जाते. दांडपट्टय़ामध्ये पोलादाचा एक पातळ पट्टा असतो. त्याला पकडण्यासाठी मूठ बनवलेली असते. त्या मुठीमध्ये हात घालून पकडले जाते. प्रात्यक्षिक म्हणून ९ हातांवरील लिंबू किंवा १२ हातांवरील लिंबू, म्हणजे ९ फूट किंवा १२ फूट अंतरावर लिंबू ठेवून तो उडवला जातो. तर तलवारबाजीमध्ये दोन प्रतिस्पर्धी एकमेकांना मारत आणि स्वतःला वाचवत ही कला दाखवतात. तलवारबाजी ही कला आता बहुतांश लुप्त होत चालली आहे. त्यामुळे आता या कलेचा समावेश शाळांमधील खेळांमध्ये करण्यात आला आहे.

मराठी हशमांमध्ये एक म्हण होती “धारकरी ” म्हणजे जे व्यक्ती तलवार , भाला तीर कमान अथवा अजुन काही अशा ४-५ हत्यारांमध्ये तरबेज असली की त्यांना “धारकरी” गणले जायचे.अन अजुन एक म्हण होती की “दहा धारकरी तर एक पट्टेकरी ” यावरुनच पटाईताला काय मान असेल हे लक्षात येते.

पट्ट्याची लांबी ५ फ़ुट असते .त्याचे पाते ४ फ़ुट असुन त्याची मुठ म्हणजे खोबळा साधारण १ फ़ुटाचा असतो. याचे पाते लवचिक असते .पाते लवचिक असले तरी याच्या कौशल्याने केलेल्या वाराने उभा माणुस चिरला जावु शकतो. पट्टा चालवणारा जणु काही आपल्या भोवती १० फ़ुटांचा पोलादी घेर उभा करतो.यात प्रवेशल्यावर साक्षात म्रुत्युच.दोन्ही हातात पट्टा घेणारा पटाईत हा अतिकुशल समजला जातो.याचे कौशल्य अन प्रहार क्षमता साहजिकच दुपट असते.

शाळांमध्ये तलवारबाजी शिकवायला सुरुवात करण्यात आल्याने येथे खऱयाखुऱया तलवारीऐवजी वेगळी तलवार वापरली जाते. यात दोन्ही खेळाडूंना एक विशिष्ट प्रकारचा ड्रेस दिला जातो. दोघांना एक दोरीने जोडले जाते. जेणेकरून त्यांना ठरावीक अंतराच्या पुढे जाता येत नाही. यामध्ये हा खेळ म्हणजे लढाईसारखाच असतो, पण एकमेकांना न मारता प्रतिस्पर्धकाला आपल्या तलवारीने स्पर्श करायचा आणि स्वतःला वाचवावे लागते. यामध्ये जो ड्रेस दिला जातो त्याला काही सेन्सर्स असतात. त्यामुळे तलवारीचा स्पर्श जरी झाला तरी लगेच एक घंटा वाजते आणि पॉइंट मोजला जातो.

महाराष्ट्राच्या मर्दानी खेळांमध्ये तलवारबाजी हा खेळ सामील करावा लागेल. कारण हा युद्धकौशल्य दाखवणारा मर्दानी खेळ आहे. तो पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. खंडोबा देवाच्या तीर्थक्षेत्री जेजुरीत दरवर्षी हा मर्दानी खेळ पारंपरीक पद्धतीने खेळतात. धाडस, सावधानता आणि चपळता ही तीनही कौशल्ये तलवारबाजीत दिसतात. अशा प्रकारे आता युद्धकला जपण्यासाठी खेळाच्या स्वरूपात वापरून त्याचे सांगोपन होत आहे. तलवारबाजीही आता ऑलिंपिकमध्येही समाविष्ट आहे. म्हणून याला आता विशिष्ट महत्त्व आले आहे.
पारंपरिक खेळ शिकण्यासाठी एक ते सहा महिन्यांचा वेळ लागतो. स्वरक्षणासाठी मुलींनी हे खेळ शिकलेच पाहिजेत. त्यामुळे एक आत्मविश्‍वास आणि स्वतःमध्ये निर्भीडपणा येतो.

दांडपट्टा

दांडपट्टा किंवा पट्टा हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले तलवारीसारखे पात्याचे शस्त्र आहे. सहसा यामध्ये लांबलचक, सरळसोट आकाराचे, पोलादापासून बनवलेले पाते मुठीवर चढवता येणाऱ्या चिलखती हातमोजास जोडलेले असते. चिलखती हातमोजा मूठ व कोपरापासून पुढचा हात झाकेल, अश्या बनावटीचे असते. जवळच्या अंतरावरून हातघाईच्या लढाई लढताना याचा वापर केला जाई. विशेषकरून मराठ्यांच्या पायदळाने अनेक युद्धमोहिमांत याचा परिणामकारक वापर केला.याची भेदकता तलवारीहुन जहाल.उभ्या हिंदुस्थानात या शस्त्रावर मराठ्यांइतके नियंत्रण कोणाचेच नाही,मुघल राजपुत लोकांमध्येही हे हत्यार असायचे,पण मराठे यात जास्त कुशल अन तरबेज होते.

पट्टा फ़िरवणे मोठे कौशल्याचे काम आहे ,खुप कसब आणि अभ्यास असलेला माणुस पटटा व्यवस्थित फ़िरवु शकतो,पुर्वीचे मावळे १६ हात लांब पट्टाही वापरत,याला बेल्ट प्रमाणे कंबरेभोवती गुंडाळले जाई,सय्यद बंडा ला जिवा महालाने १६ हात लांबुन कलम केले होते.छोट्याश्या लिंबाचे दोन तुकडे पट्ट्याने होतात. आपण मराठीत पटाइत हा शब्द वापरतो,म्हणजे तरबेज,मुळात पट्टे चालवण्यात वाकबगार असलेल्या लोकांना पटाईत असे म्हणले जाते,तोच शब्द पुढे आपल्या बोली भाषेत रुढ झाला.

पट्ट्याची लांबी ५ फ़ुट असते,त्याचे पाते ४ फ़ुट असुन त्याची मुठ म्हणजे खोबळा साधारण १ फ़ुटाचा असतो,याचे पाते लवचिक असते,पण लवचिक असले तरी याच्या कौशल्याने केलेल्या वाराने उभा माणुस चिरला जावु शकतो,गर्दन देखिल कटू शकते पट्टा चालवणारा जणु काही आपल्या भोवती १० फ़ुटांचा पोलादी घेर उभा करतो,यात प्रवेशल्यावर साक्षात म्रुत्युच दोन्ही हातात पट्टा,घेणारा पटाईत हा अतिकुशल समजला जातो,याचे कौशल्य अन प्रहार क्षमता साहजिकच दुपट असते .याचं वैशिष्ट्य म्हणजे पाते जरी लवचिक असले तरी पण याची वार करण्याची तलवारीपेक्षा क्षमता जास्त असते, याचं कारण आपण तलवार फ़िरवताना सगळा जोर आपल्या मनगटातुन लावत असतो,पण प्रत्यक्षात पट्टा फ़िरवताना आपला पुर्ण हात आपला दंड,खांदे आणि विंग्ज्चा भाग या सर्व अवयवांतुन ताकद लागलेली असते,पाते लवचिक असले तरी,जर वार करताना पाते लपकले नाही,अन वार सरळ झाला तर सरळ एक घाव दोन तुकडे होतात ..