१८२५: बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राईज नावाचे जहाज कोलकाता बंदरात दाखल झाले. भारतात आलेले अशा प्रकारचे ते पहिले जहाज होते
१८५६: पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात झाला.
१९१७: पहिले महायुद्ध – अमेरिकेने ऑस्ट्रिया/हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.
१९३५: प्रभातचा धर्मात्मा हा अस्पृष्योद्धारावरचा चित्रपटमुंबईतील कृष्ण सिनेमात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रभात व बालगंधर्व यांनी
बालगंधर्व-प्रभात या संयुक्त बॅनरखाली बनवला होता.
१९४१: दुसरे महायुद्ध – जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला.
१९७५: इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.
१९८८: यासर अराफात यांनी इस्त्राएलच्या अस्तित्त्वास मान्यता दिली.
१९९४: कन्‍नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर.
१९९५: फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन इन्सॅट-२सी
या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
१९९८: ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड.
२०१६: पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्स चे पीके ६६१ विमान कोसळले. यात ४७ लोकांचा मृत्यू.

१८९४: सुएझ कालव्याचे सहनिर्माते फर्डीनंट द लेशप्स. (जन्म: १९ नोव्हेंबर १८०५)
१९४१: कविवर्य भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे. (जन्म: २७ ऑक्टोबर १८७४)
१९७६: विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ गोवर्धनदास पारेख.
१९८२: संगीतशिक्षक बाबूराव विजापुरे. (जन्म: १७ जून १९०३)
१९९३: इव्होरी कोस्ट आयलंडचे पहिले अध्यक्ष फेलिक्स हॉफॉएट-बोजि. (जन्म: १८ ऑक्टोबर १९०५)
१९९७: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे अलाहाबाद येथील अलोपी आश्रमात निधन. (जन्म: १६ जुलै १९१३ – अच्छाती, बस्ती, उत्तर प्रदेश)
२००४: अॅमवे चे सहसंस्थापक जय व्हॅन ऍन्डेल. (जन्म: ३ जुन १९२४)
२०१३: ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विनय आपटे.
२०१६: पाकिस्तानी गायक आणि इस्लाम धर्मप्रचारक जुनैद जमशेद यांचे विमान अपघातात निधन.