१८४६: इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन चा शोध लावला.
१९११: चीनमध्ये किंग वंशाचा शेवट.
१९१३: पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले.
१९४२: सोव्हिएत युनियनचे ऑस्ट्रेलिया बरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९४४: दुसरे महायुद्ध –८०० जिप्सी बालकांना छळ छावणीत ठार केले.
१९५४: श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले.
१९६०: विद्याधर गोखले यांच्या सुवर्णतुला या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९६४: जपानमधील टोकियो येथे १८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९७०: फिजीला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.
१९७५: पापुआ न्यू गिनी चा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश केला.
१९९८: आदर्श सेन आनंद भारताचे २९ वे सरन्यायाधीश.
२०१४: कैलास सत्यार्थी आणि मलाला युसुफ़ज़ई यांना २०१४चा नोबेल शांती पुरस्कार.