१७९१: फ्रेन्च संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले.
१८३७ : भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.
१८८० : थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला.
१८९१: स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना झाली.
१९४३: दुसरे महायुद्ध –दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेपल्स शहरावर ताबा मिळवला.
१९४६: युनायटेड किंग्डममधे मेन्सा इंटरनॅशनल या संस्थेची स्थापना झाली.
१९४९: संगीत रंगभूमीवरील गायक,अभिनेते जयराम शिलेदार यांनी स्वत:ची मराठी रंगभूमी नाट्यसंस्था स्थापन केली.
१९५८: भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.
१९५९: भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६०: नायजेरियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९६९: कॉनकॉर्ड विमान प्रथमच ध्वनीगती पेक्षा जोरात उडण्यात यशस्वी झाले.
१९७१: अमेरिकेतील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड सुरु झाले.
१९८२: सोनी कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर प्रकाशित केले.
१९९२: कार्टून नेटवर्क सुरु झाले.
२००२: भारतीय दंड संहिता, मोटार वाहन कायदा, १९८८ आणि मुंबई प्रतिबंधक कायदा १९४९ अंतर्गत सलमान खान वर गुन्हा दाखल.
तसेच मुंबई पोलिसांनी सलमान विरुद्ध भारतीय दंड संहिता कला ३०४(भाग-२) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
२००५: इंडोनेशियातील बाली बेटांवर बॉम्बस्फोटांत १९ जण ठार झाले.
२०१५: ग्वाटेमालात जोरदार पाऊस आणि भूस्खलन. १३१ लोकांचा मृत्यू तर शेकडो गहाळ.