१९०४: चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.
१९४७: अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९५०: कृ. भा. बाबर यांनी समाजशिक्षणमाला स्थापन केली.
१९५२: केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू.
१९६२: चीनने भारतावर आक्रमण केल्या मुळे चीन-भारत युद्धास सुरवात.
१९६९: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना.
१९७०: हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर.
१९७१: मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला.
१९७३: सिडनी ऑपेरा हाऊस चे उद्घाटन एलिझाबेथ (दुसरी) यांनी केले.
१९९१: उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.
१९९५: ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स या संस्थेकडून हिन्दी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना मॅन ऑफ द सेंचुरी हा सन्मान जाहीर.
२००१: रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना विष्णुदास भावे गौरवपदक जाहीर.
२०११: लिबीयन गृहयुद्ध –राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council)च्या सैनिकांनी
हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.
२०१४: राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या जोको विडोडो यांनी इंडोनेशियाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.
२०१४: आन्ध्र प्रदेश मधील पूर्व गोदावरी जिल्ह्यात फटाका फॅक्टरीला आग. कमीतकमी १३ लोकांचा मृत्यू.

१८९०: ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर सर रिचर्ड बर्टन . (जन्म: १९ मार्च १८२१)
१९६१: व्ही. एस. गुहा –मानववंशशास्त्रज्ञ. १९४६ मध्ये त्यांच्या प्रयत्‍नांनी कलकत्ता येथे भारतीय मानववंशशास्त्र संशोधन संस्था स्थापन झाली.
भारतात जनगणनेच्या कार्यात त्यांनी मौलिक भर घातली.
१९६४: अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूव्हर . (जन्म: १० ऑगस्ट १८७४)
१९७४: कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा मास्टर कृष्णराव–प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार, त्यांच्या गायनात ग्वाल्हेर,
आग्रा व जयपूर घराण्यांचा संगम दिसून येई. वंदे मातरमला त्यांनी दिलेली चाल लोकप्रिय ठरली. (जन्म: २० जानेवारी १८९८)
१९८४: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ पॉल डायरॅक . (जन्म: ८ ऑगस्ट १९०२)
१९९६: पत्रकार, युद्धशास्त्राचे अभ्यासक दि. वि. तथा बंडोपंत गोखले.
१९९९: समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार माधवराव लिमये .
२००९: गुप्तहेरकथालेखक वीरसेन आनंदराव तथा बाबा कदम . (जन्म: ४ मे १९२९)
२०१०: क्रिकेटपटू पार्थसारथी शर्मा. (जन्म: ५ जानेवारी १९४८)
२०११: लिबीयाचे हुकूमशहा मुअम्मर गडाफी. (जन्म: ७ जून १९४२)
२०१२: पृथ्वी दिनाची सुरवात करणारे जॉन मॅककनेल. (जन्म: २२ मार्च १९१५)