१८९४: महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना.
१९२२: बेनिटो मुसोलिनी इटलीचे पंतप्रधान बनले.
१९५८: महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्‍न पुरस्कार प्रदान.
१९६१: संयुक्त अरब प्रजासत्ताकमधून सीरिया देश बाहेर पडले.
१९६४: टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.
१९९४: विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा होमी भाभा पुरस्कार डॉ. टी. ज्ञानशेखरन
आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर.
१९९६: स्वदेशात बनविलेली कामिनी ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्‍कम येथे कार्यान्वित करण्यात आली.
१९९६: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड.
१९९७: माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला ‘माणिकर‍त्‍न पुरस्कार‘ गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर.
१९९७: अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर.
१९९९: चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान.
२००५: दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार.
२००८: डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी
विमान वाहतुक कंपनी बनली.
२०१५: चीनमध्ये दोन मुले जन्माला घालण्यास कायद्याने मान्यता दिली. ३६ वर्षांपासून सुरू असलेल्या कुटुंब कल्याण योजनेला
(एक मूल) सरकारने गुंडाळताना चिनी दांपत्यांना दोन मुलांचे अधिकार दिले.