१८८२: थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.
१८८८: जॉर्ज इस्टमन याने कोडॅक हा ट्रेडमार्क नोंदवला व फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.
१९०९: बालवीर (Scout)चळवळीचा पहिला मेळावा झाला. लॉर्ड बेडन पॉवेल यांनी सुरू केलेली ही चळवळ थोड्याच काळात जगभर पसरुन लोकप्रिय झाली.
१९३७: व्हेनिसमधील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी
एक चित्रपट म्हणून निवड झाली. इतर दोन चित्रपट होते ऑस्ट्रेलियाचा ’फ्लाइंग डॉक्टर’ आणि हंगेरीचा ’मारिया नोव्हेर’.
१९७२: मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.
१९९८: स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.
२००१: हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली.
२०१३: रघुराम राजन यांनी रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे २३वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला.
२०१६: वैटिकन सिटी मधील एका घार्मिक कार्यक्रमात मदर टेरेसा यांना पोप फ़्रांसिस यांनी संत ही उपाधी प्रदान केली.

१९९७: डॉ. धर्मवीर भारती –हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व धर्मयुग साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक,अभ्युदय व संगम या नियतकालिकांचे संपादनही केले. (जन्म: २५ डिसेंबर १९२६)

२०००: मोहम्मद उमर मुक्री–आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते (जन्म: ५ जानेवारी १९२२)
२०१२: भारतीय लेखक सय्यद मुस्तफा सिराज. (जन्म: १३ ऑक्टोबर १९३०)

२०१२: भारतीय गायक-गीतकार हांक सूफी . (जन्म: ३ मार्च १९५२)

२०१५: भारतीय सर्जन आणि राजकारणी विल्फ्रेड डी डिसोझा. (जन्म: २३ एप्रिल १९२७)