१८६४: एका भीषण चक्री वादळामुळे कोलकात्यात सुमारे ६०,००० लोक ठार आणि शहर उद्धस्त झाले.
१९१०: पोर्तुगालमधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक बनले.
१९४८: अश्गाबात येथील भूकपात सुमारे १,१०,००० लोक ठार झाले.
१९५५: पंडित नेहरुंच्या हस्ते हिन्दूस्तान मशिन टूल्स या कारखान्याचे उद्‍घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात
या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.
१९६२: डॉ. नो हा पहिला जेम्सबाँड चित्रपट प्रदर्शित झाला.
१९८९: मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्‍च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.
१९९५: कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर.
१९९८: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.
२०१५: पॅसिफ़ीक रिमच्या सदस्य देशांचं, ट्रांस पैसिफ़िक समझोत्यावर एकमत.