• तिथी :

चैत्र शुद्ध नवमी

  • पार्श्वभूमी :

प्रभु श्री रामाचा जन्म दिवस. भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमी, गुरूवार, पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता. विशेष म्हणजे, महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित मानस लिहण्यास सुरवात केली होती.

  • साजरा करण्याची पारंपारिक पद्धत :

राममंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस कथाकीर्तन रामायण पारायण, असे कार्यक्रम आयोजित करतात. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. या दिवशी मध्यान्ही रामजन्माचा सोहळा होतो. कुंची घातलेला एक नारळ किवा श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात व भक्‍तमंडळी त्यावर गुलाल व फुले उधळतात.

रामाच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठीपण घालतात. रामाची पूजा करताना त्याला करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात. तसेच श्रीरामाला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात.. श्रीरामाला केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात.. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजर्‍या केल्या जाणार्‍या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो.

  • वैशिष्ट्य :

धर्मीयांचे आदर्श अन्‌ लाडक दैवत. जगकल्याणासाठी, धर्म रक्षणासाठी, दुष्टांच्या र्निदालनासाठी, भगवान महविष्णूंनी जे दशावतार घेतले, त्यामध्ये श्रीराम अवतार हा त्यांचा सातवा अवतार. या दिवशी  रामायण वाचनाचे अधिक महत्व आहे.

  • खाद्यपदार्थ :

राम जन्मोत्सवानंतर सुंठवडा वाटण्याची प्रथा आहे.