१४९३: ख्रिस्तोफर कोलंबस यांनी पोर्तो रिको हे बेट पहिल्यांदा पाहीले.
१८०९: फ्रान्सच्या आरमाराने बंगालच्या उपसागरात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.
१८८२: अण्णासाहेब किर्लोस्करांचे संगीत सौभद्र हे नाटक रंगभूमीवर आले.
१९०५: लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.
१९१८: लाटव्हियाने आपण रशियापासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
१९२८: वॉल्ट डिस्‍ने यांच्या मिकीमाऊस या प्रसिद्ध कार्टूनचा स्टीमबोट विली या चित्रपटाद्वारे जन्म.
१९३३: प्रभातचा पहिलाच रंगीत चित्रपट सैरंध्री प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने प्रभातने
पुन्हा रंगीत चित्रपट काढला नाही.
१९५५: भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.
१९६२: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.
१९६३: पहल्या पुश-बटण टेलिफोनची सेवा चालू झाली.
१९९२: ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९३: दक्षिण अफ्रिकेत २१ राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.
२०१५: टेनिसपटू रॉजर फेडरर ने नोव्हाक जोकोविच ला पराभूत करून एटीपी वर्ल्ड टूर लंडन च्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.
२०१५: भारतीय शटलर पी. व्ही. सिंधू ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलिना मारीन हिने पहिल्याच फेरीत पराभूत केले.
२०१५: भारतीय शटलर किदाम्बी श्रीकांत ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत चीनच्या तियान हुवेई ने पहिल्याच फेरीत पराभूत केले.
२०१५: भारतीय शटलर जयराम चा काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत चीनच्या चेन लोंग ने पहिल्याच फेरीत पराभूत केले.
२०१५: भारतीय महिला दुहेरी शटलर जोडी ज्वाला व अश्विनी यांचा काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभव.
२०१५: भारतीय स्क़्वाॅश खेळाडू सौरव घोशाल चा बेलिबी येथे जागतिक स्क़्वाॅश स्पर्धेत ईंग्लंडच्या जेम्स विल्यस्ट्राप ने दुसऱ्या फेरीत पराभूत केले.

१७७२:माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव पेशवे –मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा (जन्म: १६ फेब्रुवारी १७४५)
१८३०: इल्युमिनॅटि चे संस्थापक अॅडम वाईशप्त . (जन्म: ६ फेब्रुवारी १७४८)
१९३६: भारताचे वकील व राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई . (जन्म: ५ सप्टेंबर १८७२)
१९६२: नील्स बोहर –अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक (जन्म: ७ ऑक्टोबर १८८५)
१९९३: लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक पु. रा. भिडे तथा स्वामी विज्ञानानंद.
१९९६: समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे आरंभापासूनचे नेते कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई .
१९९८: भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक तारा सिंग हेर . (जन्म: १५ नोव्हेंबर १९३६)
१९९८: रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले –सातार्‍याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक,
वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे समाजसेवक
१९९९: रामसिंह रतनसिंह परदेशी –स्वातंत्र्यसैनिक, कॅपिटॉल बॉम्ब स्फोट कटातील एक आरोपी
२००१: नारायण देवराव पांढरीपांडे तथा नाडेप काका –गांधीवादी विचारवंत व नाडेप कंपोस्ट खताचे जनक. गायीच्या शेणापासून कंपोस्ट
खत तयार करुन त्यांनी रासायनिक खतांना पर्याय दिला. त्यांची पद्धत भारतातील अनेक कृषी विद्यापीठांनी स्वीकारली.
२००६: काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु –मराठी कथाकार व कवी (जन्म: ६ एप्रिल १९१७)
२०१३: भारतीय संगीतकार एस. आर. डी. वैद्यनाथन . (जन्म: १५ मार्च १९२९)
२०१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते सी. रुधराय्या.