ठळक घटना

१८५७: बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.

१९३०: प्रभात चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

१९६८: महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.

१९७३: व्हिएतनाम युद्ध – व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.

१९८२: एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.

२०१४: इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले.

२०१५: ऑस्ट्रेलिया ने २०१५ क्रिकेट विश्व कप जिंकला.

जन्म/वाढदिवस

१८६९: दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स. (मृत्यू: १ जानेवारी १९४४)

१९१८: वॉलमार्ट चे निर्माते सॅम वॉल्टन यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९९२)

१९२६: अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ . (मृत्यू: २१ मार्च २०१०)

१९२९: रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त . (मृत्यू: १९ ऑगस्ट १९९३)

१९३०: मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ .

१९४३: इंग्लंडचे पंतप्रधान जॉन मेजर .

१९४८: साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नागनाथ कोतापल्ले .

मृत्यू/पुण्यतिथी

१९६४: इतिहाससंशोधक शंकर नारायण तथा वत्स जोशी .

१९९७: सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर . (जन्म: ११ सप्टेंबर १९१५)