१८६४: नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले.
१८७६: भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार.
१८८०: धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) च्या दिवशी पुण्यातील आनंदोद्‍भव थिएटरमधे किर्लोस्करांच्या संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९२०: नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC)
स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
१९४१: माऊंट रशमोअर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.
१९६६: दिल्ली उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.
१९८४: पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.
१९८४: भारताचे ६वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.
२०११: जागतिक लोकसंख्या सात अब्जांपर्यंत पोचली.