“ येन केन विधि दीन्हे दान करइ कल्याण !” कोणत्याही प्रकारचे दान हे कल्याणकारीच असतं. (रामचरित मानस /103)

सर्वच धर्म कमी-अधिक फरकाने लोकांसाठी किंवा समाजासाठी काय करावे, याची शिकवण देतात. त्या शिकवणीमध्ये दान हे सर्वप्रथम येते. ऋग्वेदामध्ये दानस्तुतीपर सुक्ते आली आहेत. ‘शरयतेजं कृती: दाक्ष: दानं ईश्वर भावश्च क्षात्रं कर्म”, ‘दानेन हरते व्याधिम्,, बौद्ध उपासकही ‘दानं प्रसाद:’ हे वचन मानतात.दानाच्या या संकल्पनेमागे सोशल कमिटमेंट आहे. पाणपोई जशी तहानलेल्यांची तहान भागवते तशीच आपली ही दानपोई अनेकांसाठी समाधानाचा प्रसाद ठरणार आहे. महाराष्ट्रापासुन दूर वसलेल्या आपल्या बांधवांना महाराष्ट्रात  विविध क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने समाजसेवा करणाऱ्या संस्थांशी जोडणारा दुवामराठी ग्लोबल व्हिलेज ठरावा हा आमचा एक भाबडा प्रयत्न.

“प्रपंच सुखेनैव करावा

परंतु काही परमार्थ वाढवावा “असं समर्थ वचन आहे, फक्त  हे दान सत्पात्री असावं हा आमचा मनोमन प्रयत्न .काही सामाजिक संस्थांचा इथे समावेश करतोय. ह्या अवीरत पणे काम करणा-या संस्थांना आपण मदत पाठवू शकता. त्यासाठी त्यांचे संपर्क ठिकाण आणि क्रमांक देत आहोत. आपण त्यांच्याशी थेट सवाद साधून आपापल्या पध्दतीने फुल ना फुलाची पाकळी मदत पाठवू शकता…. चला तर तेंव्हा दानक्रांती घडवू या.. कारण ,

दानधर्म , जाणिजें यज्ञकर्म